श्रीराम ॥ नाना वस्त्रें नाना भूषणें । येणें शरीर श्रृंघारणें । विवेकें विचारें राजकरणें । अंतर श्रृंघारिजे ॥ १। शरीर सुंदर सतेज । वस्त्रें भूषणें केले सज्ज । अंतरीं नस्तां च्यातुर्यबीज । कदापि शोभा न पवे ।।2।

Featured

ALL THAT GLITTER IS NOT GOLD !

समर्थ रामदासांच्या श्रीमत दासबोधातील ग्रंथातील अठराव्या दशकातील सहावा समास, पहिली आणि दुसरी ओवी…
समर्थाना लोकांकडून कोणत्या पद्धतीचे आचरण अभिप्रेत आहे हे या ओव्यांमधून आकलन होते.
समर्थ म्हणतात लोक नाना प्रकारचे वस्त्र परिधान करतात , त्यावर साजेसे दाग दागिने देखील घालतात. पण हे झाले देहाचे. देहाचा शृंगार करणे तितके कठीण नाही. ते कोणीही करेल. परंतु आपला देह जसा सुंदर दिसायला हवा असे आपल्याला वाटते तसेच आपले अंतर देखील असावे. अंतर म्हणजे अंत:करण.

अंत:करणं म्हणजे मनाचा आरसा. कधी ते दुःखी असत कधी सुखी , कधी निराश तर कधी सुखी , कधी पवित्र तर कधी अपवित्र. कधी समाधानी तर कधी असंतुष्ट. तेव्हा जर तेच उत्तम नसेल तर वर वरून देहाला सजवून काहीच उपयोग होत नसतो, तेव्हा माणसाने सबाह्य अभ्यंतरीं …. बाहेरून आणि आतून दोन्हीकडून सुंदर असायला हवं.. नुसता वर वरचा देखणे पणा पुरेसा नाही…!!

एक सुंदर उदाहरण आहे ….कुठेतरी ऐकलेलं ….

एकदा एका नामवंत कंपनीसाठी योग्य उमेदवाराची गरज होती. बरेच जण नोकरीसाठी मुलाखत द्यायला आले होते. खूप मोठी रांग लागली होती. मुलाखतीसाठी उत्तम भाषा कौशल्य असणारे , पदवीधर अगदी सूट बूट घालून उत्तम तयारी करून आले होते . मुलाखत देण्यासाठी जो कोणी आत जायचा तो घाम पुसत बाहेर यायचा. कोणालाच काही कळेना, बरे आधी आतमध्ये काय झाले हेही विचारायची हिम्मत होत नव्हती. असे करता करता एक व्यक्ती आत गेला. त्याला सांगितले तुम्ही ज्या ऑफिस मध्ये उभे आहेत त्या ऑफिसच्या खिडकीतून खाली उडी मारा..
ऐकणाऱ्याचे धाबे दणाणले.. तो अचंभित झाला . त्यापेक्षा हि अशी नोकरी न केलेली बरी असे म्हणून बाहेर निघून गेला. ५ व्या मजल्याच्या खिडकीतून खाली उडी मारायची …. हि काय मुलाखत घ्यायची पद्धत आहे का…!असे बोलून तो निघून गेला…!
तेव्हा गावाकडून आलेला एक साधा गरीब मुलगा आत गेला , फारसा तयार नाही पण नीटनेटका , खूप जास्त भाषा त्याला ज्ञात नसल्या तरी आपले म्हणणे समोरच्या पर्यंत पोहोचेल , पटेल इतकं माहित असलेला.
तो आत गेला , त्याला देखील तेच सांगितले जे आधीच्या मुलांना सांगितले गेले.
खिडकीवरून खाली उडी मारा ….
तो खिडकीपाशी गेला , खिडकीच्या बाजूला असलेल्या आधाराला धरून चढला. तिथे उभं राहण्यासाठी पुरेशी जागा होती.. त्याने खिडकीवरून ऑफिस मध्ये उडी मारली ….
आणि तो पास झाला… त्यांना हवा असलेला कम्पनीचा भावी उमेदवार …संकटाचा वेगळ्या पद्धतीने विचार करणारा..
हो,,, कारण खिडकीतून खाली उडी मारा इतकाच सांगितलं होत… कुठे उडी मारा हे नाही !!
त्यांना जे अपेक्षित होत अगदी तेच त्या मुलाने केलं… कारण त्याने त्याच्या जवळचं चातुर्य वापरलं!
आणि तो जिंकला !!!
म्हणून समर्थ म्हणतात
श्रीराम ॥ नाना वस्त्रें नाना भूषणें । येणें शरीर श्रृंघारणें । विवेकें विचारें राजकरणें । अंतर श्रृंघारिजे ॥ ११ । शरीर सुंदर सतेज । वस्त्रें भूषणें केले सज्ज । अंतरीं नस्तां च्यातुर्यबीज । कदापि शोभा न पवे..

प्रिय पप्पांस,


आज गुगल वर शोधत होते तुम्हाला , म्हणतात तिथे सगळं काही भेटत. सर्च केलं तुमचं नाव… तुमचं नाव आलं.. पण तुम्ही नाही भेटलात. माझ्यासाठी माझं छत्र गेलं , जाताना जराही वाटलं नाही का ? माझ्या मुलीची काय अवस्था होईल? असं म्हणतात लोक माणूस गेल्यावर लोक १२ दिवस दुःखच पाळतात. नंतर काळाच्या ओघात जखम भरून निघते. माणसं विसरतात. पण मी ,,, मुलगी आहे तुमची. मी अजून माझ्या हृदयात तुम्हाला जिवंत ठेवलंय. प्रत्यक्षात तुम्ही नाही भेटत मला. पण तुमच्या आठवणी आहेत माझ्या सोबत. शब्द आहेत धीर देणारे.
आज फार आठवण येतेय तुमची. माहित नाही का. तशी रोज येतेच.
एका लहानशा बाळाला समोर ठेवून जगतेय. तस आयुष्य जगण्यासाठी काहीच बाकी राहील नाही माझ्या जवळ. मला वाटत यावं तुमच्यापाशी. पण माझा कार्यभाग अजून आटपला नाही.
किती वेळ लागेल माहित नाही. पण जेव्हा ऋणातून मुक्त होईन . सगळ्यात आधी तुम्हाला भेटेन.
अजून बऱ्याच गोष्टी आहेत. प्रारब्ध आहेत. पूर्वसंचितात काय लिहून ठेवलंय माहित नाही.
बाळाचा सांभाळ त्याच्यावर सोपवलंय. जेव्हा कोणाचं कोणी नसत तेव्हा तोच असतो ..परमेश्वर !
माझ्या बाळाच्या संगोपनात काही कमतरता राहू नये या साठी मला आशीर्वाद द्या. त्याला उदंड आयुष्य लाभो , तो सुधृढ आणि यशस्वी होवो , सामर्थ्यवान होवो यासाठी आशीर्वाद द्या !
माझी जगायची फारशी इच्छा नाही. पण जगण्यासाठी एक कारण आहे माझ्या कडे!
माझी जबाबदारी पूर्ण झाली कि मी येईन भेटायला तुम्हाला.
तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत असूद्यात !
तुमची मुलगी

औषधं आणि आम्ही ! MEDICINE AND WE !

औषधं आणि आम्ही ! MEDICINE AND WE…..!

आजकाल आजारी होताच लोक इस्पितळात धाव घेतात. घरघुती उपाय पूर्वीसारखे राहिलेच नाहीत. ते करता येतील पण ते करण्यासाठी एकतर कोणाकडे वेळ नसतो किंवा माहिती..
आजारी पडल्यावर उपचार करणे हे जितके योग्य असते तेवढेच महत्वाचे आपल्याला शरीराला ओळखणे.
ताप येणं हा काही आजार नसतो , आपल्या शरीरात होणाऱ्या बदलाची जाणीव तो करून देत असतो . ताप आल्यावर औषधं घेणं जितकं आवश्यक तेवढाच हा ताप का आला याच कारण शोधणं.
शरीर हे एक असं यंत्र आहे कि त्यात झालेला बिघाड ते काही टक्के स्वतःहून बर करतो. शरीराची
रोग प्रतिकार शक्ती ते काम करत असते.
आपण बरेचदा बघतो एखादी जखम झालेली असताना ती बरी होताना त्यावर आपोआप आवरण येत जाते. रक्त काही अंशी निघून गेल्यावर कोणतेही औषधं न लावताही तेथे रक्ताच्या गुठळ्या होऊन रक्त बाहेर येण्याचे थांबते.
विषय इथे संपत नाही . महत्वाचे हे कि प्रत्येकाने आपल्या शरीराला ओळखणे खूप महत्वाचे असते.
मानसिक स्थिती मुळेही शरीरावर बरेच परिणाम होत असतात. उत्तम मानसिक अवस्था शरीराला उत्तम ठेवते. तेच ती ढासळली कि त्याचा वाईट परिणाम शरीर दर्शवते.
बाजारात सध्या औषधं कंपन्यांच्या जाहिराती करणाचा सुळसुळाट चालू आहे. आजारांवर बरीच औषधे उपलबद्ध देखील आहेत. पण ती किती आणि कितपर्यंत घ्यावी यासाठी नेहमी जागरूकता ठेवावी. हल्ली नेट च्या युगात माहिती मिळणे तसे फार अवघड राहिले नाही. आपण ज्या औषधांचा भडीमार आपल्या शरीरावर करत आहोत त्या आपल्या शरीरावर काय परिणाम करतात याची माहिती देखील जागरूक राहून शोधून काढावी.
आपल्या शरीरात कमी असलेल्या गोष्टींची झीज भरून काढण्यासाठी आपल्या रोजच्या खाण्यातले पदार्थ देखील फायदेशीर ठरतात. रोज हलका व्यायाम , पुरेसा सूर्यप्रकाश, आहारातले पथ्य , निरोगी मन, रोग प्रतिकार शक्ती वाढेल असे घरगुती अन्न हे एवढे पुरेसे असते सुदृढ राहण्यासाठी.
तेव्हा म्हणचे ऐकावेच पण शरीराचेही ऐकावे.. तेही बोलत असतेच आपल्याशी …संवाद साधता आला पाहिजे …आपल्या शरीराला आपल्यापेक्षा जास्त कोणीच जाणत नसत…
“शेवटी काय तर सर सलामत तो पडगी पचास !

LIFE_SPIRITUALITY_ MANAGEMENT

life is simple but we are making it critical. griefs are comes like cyclone but it also teach us how much we should have to be strong.. Really no one here is happy.. everyone has some story. But we have to come out from our griefs. And definitely we will. A spiritual guide will take you out of from all the worries and problems. Here are some benefits of spiritual practice.

Quick Concentration , Healthy Body, Fresh Mood, Fast Brain Function, Boost Sense Of Humor

All these benefits we will get when we take one step ahead in spirituality. Spirituality makes the things simple which is complicated to us.

Here is meaning of word “spiritual” : Spirit+ Ritual = Spiritual , Every Body has there own spirit. After a death body will not be there but soul will be there forever. A good soul create there own positive aura , where as bad soul creates a negative energy. so we should always practice for the spirituality where you can boost your soul